उन्हाळ्यात शरीरातील उष्णता का वाढते – थंडावा टिकवण्यासाठी आहार-विहार कसा असावा?
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता का वाढते – थंडावा टिकवण्यासाठी आहार-विहार कसा असावा? उन्हाळ्यात कडक ऊन त्यामुळे जास्त घाम येणे पाणी कमी पिणे आणि तिखट-तेलकट, चुकीच्या आहारामुळे शरीरातील पित्त वाढते, त्यामुळे उष्णता वाढते. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते तसेच शरीरात थंडावा राहण्यासाठी कोणता आहार व विहार असावा हे आजच्या लेखात जाणून घेऊ या घरगुती उपाय, डाएट टिप्स व आरोग्य सल्ला. कडक ऊन्हा मुळे घाम येणे, तहान लागणे, अंगाची आग होणे, चक्कर येणे, लघवीत जळजळ होणे, घसा कोरडा होणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, अशा समस्या अनेकांना जाणवतात. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे पित्तदोष वाढतो आणि त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. म्हणूनच या ऋतूत योग्य आहार (Diet) आणि विहार (Lifestyle) फार महत्त्वाचा असतो. 🥗 उन्हाळ्यात थंडावा देणारा आहार 1. पाण्याचे योग्य सेवन करणे दिवसातून 8–10 ग्लास पाणी प्या माठातले किंवा थंड फ्रिजचे नाही पाणी प्या थोडे थोडे पण वारंवार पाणी पिणे चांगले 2. थंडावा देणारी फळे खावीत कलिंगड/ टरबूज खरबूज द्राक्षे संत्री, मोसंबी डाळिंब ही फळे शरीरातील उष्णता कमी करत...