Posts

Showing posts with the label ताक

पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार

Image
पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार  पावसाळा सुरु झाला की आपल्या आरोग्याच्या तक्रारी वाढतात हवामानातील बदल, दमटपणा, ओलसर वातावरण, जंतुसंसर्ग आणि पचनशक्ती कमी होते म्हणून या ऋतूत आहार आणि विहार याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. पावसाळ्यात आहार कोणता घ्यावा ते बघू या  1. हलका, पचायला सोपा आहार घ्यावा जसे की मूगडाळ खिचडी, भात, वरण, फुलका. 2. सूप, उकडलेल्या भाज्या जास्त खाव्यात – गाजर, दुधी, परवल, दोडका. 3.पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या कमी प्रमाणात घ्याव्यात कारण यामध्ये कीड, जंतू जास्त प्रमाणात असतात. 4. तूप, आलं/अद्रक लसूण यांचा वापर जास्त प्रमाणात करावा याने पचन सुधारते. 5. पोटाचे विकार टाळण्यासाठी उकळलेले किंवा कोमट पाणी प्यावे पोटाचे विकार टळतात. 6. पावसाळ्याच्या दिवसात दही व थंड पदार्थ टाळावेत, ते जर सेवन केले तर सर्दी, खोकला, पोटदुखी होऊ शकते. 7. फळे – डाळिंब, सफरचंद, पेरू, केळी खाणे योग्य आहेत. पण कापलेली, रस्त्यावरची फळे टाळावीत.फळे कधीही कापून ठेऊ नये. 8. वडे,भजे, पावभाजी, बटाटा वडे,तळलेले पदार्थ, फास्टफूड कमी करावे – कारण आर्द्रतेमुळे पचायला ...

मुरूम, चेहऱ्यावर सुरकुत्या,डार्क सर्कल, सर्व व्याधींवर गुणकारी आरोग्य वर्धक ताक

Image
          आरोग्य वर्धक ताक         यशा  सुरणामृतम सुखाय,           तथा नराणां भुवि  तक्रमाहू:| जसे की स्वर्गात देवांना अमृत प्रसन्नता देते त्याच प्रमाणे पृथ्वीवरील लोकांना ताक प्रस्सनता देते.     रोग व्याधी पासुन मुक्त राहण्यासाठी ताकाचे सेवन रोज करणे आवश्यक आहे, जो ताकाचे नियमित सेवन करतो तो  मनुष्य निरोगी राहतो,  ताकापासून बनवलेली कढी अत्त्यंत पाचक असते,  भाकरी आणि ताक   याचा जर रोजच्या जेवणात समावेश केला तर शरीरातील अनेक रोगांचा नाश होऊन शरीर निरोगी राहण्यास मदत होते.       मधुर ताक पित्त नाशक असून ते शरीराला पुष्टी  देणारे आहे, पंजाब मधील लोक त्याची लस्सी बनवतात, लस्सी शरीरासाठी हितावह असून मधुर ताक,  पित्त आणि शरीरातील उष्णता घालवते,  आंबट ताक हे अग्नि दीपक  असल्यामुळे, ते अन्नाची रुची निर्माण करते.  रोजच्या आहारात ताकाचे सेवन अमृत सामान आहे. ताका मधे शीतलता देणारा गु...