Posts

Showing posts with the label काकडी

उन्हाळ्यात घ्या त्वचेची काळजी शरीराला थंडावा देण्यासाठी प्राणायाम व घरगुती उपाय

Image
     उन्हाळ्यात घ्या त्वचेची काळजी शरीराला थंडावा देण्यासाठी प्राणायाम व घरगुती उपाय        एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा पारा वाढायला सुरुवात होते.उन्हाळा म्हटलं की रखरखत उन गरमी, घसा कोरडा होऊन जीव तहानेने व्याकुळ होतो  रखरखत्या  उन्हात त्वचा काळी पडून कोरडी होते व सुरकुत्या पडायला सुरुवात होते, काहींची त्वचा तेलकट होऊन चिपचिपि व रंगहीन दिसते घामाघूम झालेली त्वचा असेल तर घामामुळे काही जनांच्या त्वचेला  खाज सूटते, त्यामुळे बरेच जण त्वचेला नखाने खाजवतात  त्वचा लाल  होऊन त्यातून रक्त पण निघते, त्वचेला जखम होऊ शकते, त्वचेवर खाज येत असेल तर नखाने न खाजवत टर्किश न्यापकीन घेऊन त्याने त्वचा हळूहळू खाजवावी, म्हणजे त्वचा लाल किंवा त्वचेला ओरबडे पडणार नाही.            बरेच वेळा गरमी मुळे लहान मुलांच्या मानेवर,  गळ्यावर, आणि पाठीवर घामोळं येते त्यासाठी कैरी पाण्यात उकळून त्या कैरीचा गर घामोळ्यांवर लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो व घामोळ्याचा त्रास ...

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?🤔

Image
उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?🤔 उन्हाळ्यात त्वचा निस्तेज होतेय? टॅनिंग, पिंपल्स आणि कोरडेपणापासून बचाव करण्यासाठी हे सोपे उपाय नक्की करा! निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी योग्य काळजी घ्या.  उन्हाळ्यात त्वचेची संपूर्ण काळजी घेण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय उन्हाळ्यात तापमान वाढते, 🌄घाम जास्त येतो आणि सूर्याच्या तीव्र 🌅किरणांचा त्वचेवर थेट परिणाम होतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, टॅनिंग, पिंपल्स, घामोळे आणि रॅशेस यांसारख्या समस्या वाढतात. योग्य काळजी घेतली तर त्वचा ताजीतवानी आणि निरोगी राहू शकते. 🥛1. भरपूर पाणी प्या उन्हाळ्यात शरीरातून घामामुळे पाण्याचे प्रमाण कमी होते. दिवसाला किमान 8–10 ग्लास पाणी प्या. नारळपाणी, ताक, लिंबूपाणी उसाचा रस पन्ह,यांचा आहारात समावेश करा. 🧴 2. सनस्क्रीन वापरणे आवश्यक घरातून बाहेर पडण्यापूर्वी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेला सनस्क्रीन लावा. दर 2-3 तासांनी पुन्हा लावणे फायदेशीर ठरते.  3. चेहरा स्वच्छ ठेवा दिवसातून 2 वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा. घामामुळे त्वचेवर जमा होणारी घाण साफ करणे आवश्यक आहे. 🥒 4. नैसर्गिक फेसपॅक वापरा काकड...

पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार

Image
पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार  पावसाळा सुरु झाला की आपल्या आरोग्याच्या तक्रारी वाढतात हवामानातील बदल, दमटपणा, ओलसर वातावरण, जंतुसंसर्ग आणि पचनशक्ती कमी होते म्हणून या ऋतूत आहार आणि विहार याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. पावसाळ्यात आहार कोणता घ्यावा ते बघू या  1. हलका, पचायला सोपा आहार घ्यावा जसे की मूगडाळ खिचडी, भात, वरण, फुलका. 2. सूप, उकडलेल्या भाज्या जास्त खाव्यात – गाजर, दुधी, परवल, दोडका. 3.पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या कमी प्रमाणात घ्याव्यात कारण यामध्ये कीड, जंतू जास्त प्रमाणात असतात. 4. तूप, आलं/अद्रक लसूण यांचा वापर जास्त प्रमाणात करावा याने पचन सुधारते. 5. पोटाचे विकार टाळण्यासाठी उकळलेले किंवा कोमट पाणी प्यावे पोटाचे विकार टळतात. 6. पावसाळ्याच्या दिवसात दही व थंड पदार्थ टाळावेत, ते जर सेवन केले तर सर्दी, खोकला, पोटदुखी होऊ शकते. 7. फळे – डाळिंब, सफरचंद, पेरू, केळी खाणे योग्य आहेत. पण कापलेली, रस्त्यावरची फळे टाळावीत.फळे कधीही कापून ठेऊ नये. 8. वडे,भजे, पावभाजी, बटाटा वडे,तळलेले पदार्थ, फास्टफूड कमी करावे – कारण आर्द्रतेमुळे पचायला ...