Posts

Showing posts with the label विहार

सकाळी कोमट पाणी पिण्याचे संभाव्य ७ आरोग्यदायी फायदे

   सकाळी कोमट पाणी पिण्याचे संभाव्य ७ आरोग्यदायी फायदे      निरोगी जीवनशैलीसाठी सकाळच्या सवयी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यापैकी एक सोपी आणि नैसर्गिक सवय म्हणजे सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे. नॅचरोपथी (Naturopathy) पद्धतीत शरीराची नैसर्गिक शुद्धी आणि संतुलन राखण्यासाठी पाण्याला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक जणांचा अनुभव असा आहे की ही साधी सवय नियमित केल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसू शकतात.       खालील मुद्द्यांद्वारे आपण कोमट पाणी पिण्याचे काही संभाव्य फायदे जाणून घेऊया. 1️⃣ पचनक्रिया सुधारण्यास मदत सकाळी कोमट पाणी पिल्याने पचनसंस्था सक्रिय होण्यास मदत होऊ शकते. रात्री झोपेत असताना शरीर विश्रांती अवस्थेत असते. सकाळी कोमट पाणी घेतल्याने आतड्यांची हालचाल (bowel movement) सुरळीत होण्यास सहाय्य होऊ शकते. नियमितपणे ही सवय लावल्यास बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. 2️⃣ शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास सहाय्य नैसर्गिक उपचार पद्धतीनुसार पाणी शरीरातील अपायकारक घटक बाहेर टाकण्यास मदत करते. कोमट पाणी घेतल्याने घाम आणि ल...

पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार

Image
पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार  पावसाळा सुरु झाला की आपल्या आरोग्याच्या तक्रारी वाढतात हवामानातील बदल, दमटपणा, ओलसर वातावरण, जंतुसंसर्ग आणि पचनशक्ती कमी होते म्हणून या ऋतूत आहार आणि विहार याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. पावसाळ्यात आहार कोणता घ्यावा ते बघू या  1. हलका, पचायला सोपा आहार घ्यावा जसे की मूगडाळ खिचडी, भात, वरण, फुलका. 2. सूप, उकडलेल्या भाज्या जास्त खाव्यात – गाजर, दुधी, परवल, दोडका. 3.पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या कमी प्रमाणात घ्याव्यात कारण यामध्ये कीड, जंतू जास्त प्रमाणात असतात. 4. तूप, आलं/अद्रक लसूण यांचा वापर जास्त प्रमाणात करावा याने पचन सुधारते. 5. पोटाचे विकार टाळण्यासाठी उकळलेले किंवा कोमट पाणी प्यावे पोटाचे विकार टळतात. 6. पावसाळ्याच्या दिवसात दही व थंड पदार्थ टाळावेत, ते जर सेवन केले तर सर्दी, खोकला, पोटदुखी होऊ शकते. 7. फळे – डाळिंब, सफरचंद, पेरू, केळी खाणे योग्य आहेत. पण कापलेली, रस्त्यावरची फळे टाळावीत.फळे कधीही कापून ठेऊ नये. 8. वडे,भजे, पावभाजी, बटाटा वडे,तळलेले पदार्थ, फास्टफूड कमी करावे – कारण आर्द्रतेमुळे पचायला ...