Posts

पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार

Image
पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार  पावसाळा सुरु झाला की आपल्या आरोग्याच्या तक्रारी वाढतात हवामानातील बदल, दमटपणा, ओलसर वातावरण, जंतुसंसर्ग आणि पचनशक्ती कमी होते म्हणून या ऋतूत आहार आणि विहार याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. पावसाळ्यात आहार कोणता घ्यावा ते बघू या  1. हलका, पचायला सोपा आहार घ्यावा जसे की मूगडाळ खिचडी, भात, वरण, फुलका. 2. सूप, उकडलेल्या भाज्या जास्त खाव्यात – गाजर, दुधी, परवल, दोडका. 3.पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या कमी प्रमाणात घ्याव्यात कारण यामध्ये कीड, जंतू जास्त प्रमाणात असतात. 4. तूप, आलं/अद्रक लसूण यांचा वापर जास्त प्रमाणात करावा याने पचन सुधारते. 5. पोटाचे विकार टाळण्यासाठी उकळलेले किंवा कोमट पाणी प्यावे पोटाचे विकार टळतात. 6. पावसाळ्याच्या दिवसात दही व थंड पदार्थ टाळावेत, ते जर सेवन केले तर सर्दी, खोकला, पोटदुखी होऊ शकते. 7. फळे – डाळिंब, सफरचंद, पेरू, केळी खाणे योग्य आहेत. पण कापलेली, रस्त्यावरची फळे टाळावीत.फळे कधीही कापून ठेऊ नये. 8. वडे,भजे, पावभाजी, बटाटा वडे,तळलेले पदार्थ, फास्टफूड कमी करावे – कारण आर्द्रतेमुळे पचायला ...

ऍसिडिटी, बद्धकोष्टता व तणाव कमी करण्यासाठी प्रभावी आसन वज्रासन

ऍसिडिटी, बद्धकोष्टता व तणाव कमी करण्यासाठी प्रभावी आसन वज्रासन          योग ही भारताची प्राचीन आरोग्यपरंपरा आहे. मानसिक व शारीरिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योगासने महत्त्वाची मानली जातात. अशाच आसनांमध्ये वज्रासन हे एक विशेष आसन आहे. बहुतेक आसने पोट रिकामे असताना केली जातात, मात्र वज्रासनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे जेवणानंतरही करता येते. त्यामुळे ते "डायजेशन आसन" म्हणूनही ओळखले जाते. वज्रासन म्हणजे काय? ‘वज्र’ हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ आहे – वीज, सामर्थ्य, कठोरता. वज्रासनात बसल्यावर शरीर स्थिर व ताठ राहते. हे एक बसून केले जाणारे ध्यानात्मक आसन आहे. प्राणायाम, ध्यान व जपासाठी सर्वाधिक सोयीचे आसन म्हणून वज्रासनाची गणना केली जाते. 1. जमिनीवर किंवा योगमॅटवर गुडघे दुमडून बसा. 2. दोन्ही पाय एकत्र ठेवून अंगठे मागे एकमेकांवर ठेवा. 3. नितंब पायांच्या टाचांवर ठेवून सरळ बसा. 4. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. 5. पाठीचा कणा सरळ व डोके उंच ठेवा. 6. डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करा. 7. या आसनात सुरुवातीला ५ मिनिटे, नंतर हळूहळू १५-२० मिनिटे बसता येते. वज...

सांधेदुखी आणि स्नायूदुखी साठी घरगुती उपचार

Image
सांधे दुखी आणि स्नायू दुखी साठी       घरगुती उपचार   पावसाळ्यामध्ये बऱ्याच जणांना सांधेदुखी आणि स्नायूदुखीचा त्रास सुरु होतो. वेदना आणि दुखणे खूप प्रमाणात वाढतात,गुडघे दुखी डोके वर काढते.  सांधेदुखी आणि वेदना दुखी किंवा कोणतीही दुखणे असो त्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहे.  लवंगाच्या तेलाने दररोज मालिश केल्यास वेदना कमी होऊ शकतात.  मीर पावडर   मिरे बारीक करून त्यात थोडेसे तेल टाकून त्वचेला मालिश करावी त्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात.  एक चमचा मिरपूड जवसाच्या तेलामध्ये लाल होईपर्यंत परतवावी व बारीक करून त्यामध्ये जवसाचे तेल टाकून ठेवावे आणि त्या तेलाने दररोज मालिश करावी.  हळद  हळदीमध्ये  कर्क्युमिन नावाच तत्व असल्याने वेदना आणि सूज कमी करण्यात मदत करते म्हणून गरम पाण्यामध्ये किंवा गरम दुधामध्ये रोज हळद टाकून प्यावी.  वेदना असलेल्या  भागांवर सरसोच्या तेलाने मालिश केल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.  तसेच गरम पाण्याचा शेक सुद्धा तुम्ही देऊ शकता.  सुंठी पावडर रोज एक  कप दुधामध्ये घेत...

फांदीची भाजी

Image
              फांदीची भाजी        श्रावण महिना सुरु झाला की आपल्याला विविध प्रकारच्या रानभज्या पाहव्यास मिळतात, त्यातीलच ऐक रान भाजी म्हणजे फांदीची भाजी, ही एक रानभाजी आहे जी आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे यात अनेक पोषक तत्वे आणि जीवनसत्त्वे असल्याने ती शरीरास फायदेशीर आहे या भाजीत असणारे घटक अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत करते   पचनक्रिया सुधारते  पोटाच्या समस्या कमी होतात रोग प्रतिकार शक्ती वाढते शरीरातील विविध आजारांशी लढण्यास मदत होते.  हाडे मजबूत करते  या भाजीत लोह भरपूर प्रमाणात आहे कॅल्शियम वगैरे असल्यामुळे हाडे मजबूत राहतात. त्वचेसाठी चांगली आहे  त्वचेला निरोगी ठेवते.  वजन कमी करण्यास मदत करते  फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे या भाजीचे सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत होते.  मधुमेह  रक्त रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते मधुमेही रुग्णांनी या भाजीचे सेवन करावे.    हृदयासाठी चांगली  रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते हृदय हृदयविकार...

मधुमेह: एक गंभीर आजार, पण योग्य माहिती आणि उपचाराने नियंत्रणात ठेवता येतो!आहारातील बदल आणि व्यायामाचे महत्त्व

Image
                 मधुमेह: एक गंभीर आजार, पण योग्य माहिती आणि उपचाराने नियंत्रणात ठेवता येतो!आहारातील बदल आणि                    व्यायामाचे महत्त्व  डायबेटिस ज्याला मराठीत 'मधुमेह' म्हणतात, ही एक चयापचय matabolic स्थिती आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची ग्लुकोज  पातळी सामान्य पेक्षा जास्त असते. शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नसल्यास किंवा शरीर तयार केलेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नसल्यास, मधुमेह होतो.  मधुमेहाचे मुख्य 2 प्रकार आहेत   मधुमेह पहिला प्रकार  या प्रकारात, शरीरात इन्सुलिन तयार करणारे पेशी नष्ट होतात, त्यामुळे शरीराला इन्सुलिन मिळत नाही. मधुमेह दुसरा प्रकार  या प्रकारात, शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत. गर्भधारणा-कालीन मधुमेह: हा मधुमेह काही स्त्रियांच्या गरोदरपणात होतो आणि बाळंतपणानंतर सामान्यतः निघून जातो.  मधुमेहाची लक्षणे: वारंवार लघवी होणे, विशेषतः रात्री. हाता पायाला मुंग्या ...

incerase- milk-child-birth-: प्रसूती नंतर दूध वाढण्यासाठी

Image
      प्रसूती नंतर दूध वाढण्यासाठी  ( सर्व चित्र संग्रहित )       आई झाल्यानंतर अनेकदा महिलांना स्तनातून दूध येत नसल्याने त्रास होतो. मात्र, घरगुती उपायांनी या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.       बाळाला जन्म दिल्यानंतर, स्त्रीचे शरीर स्तनपानासाठी तयार होते. अशा परिस्थितीत, स्तनातून पुरेसे दूध मिळणे खूप महत्वाचे आहे. कारण बाळाला केवळ आईच्या दुधातूनच पोषण मिळते. मात्र, प्रसूतीनंतर काही महिलांना स्तनामध्ये दूध कमी येत असल्याची तक्रार असते.       अनेकदा महिलांना ऐक समस्या भेडसावत असते स्तनातून दूध येत नसल्याने बऱ्याच महिलांना मानसिक त्रास होतो.  बाळाला दूध कसे मिळेल त्याचे पोट भरेल का? मात्र, घरगुती उपायांनी या समस्येपासून मुक्ती मिळू शकता.      खारीक बदाम खिर  प्रसूती नंतर दूध वाढवण्यासाठी खारीक बदामची खिर करुन खावी यात खसखस पण टाकू शकता खसखस टाकून खिर केल्यास जास्त फायदा होतो. अळीव / आहाळू  अळीव ...

बहु्गुणी आले अद्रक

Image
          बहुगणी अद्रक / आले   भारतामध्ये सर्वत्र आल्याची लागवड केली जाते             आले हृदयरोग, तसेच हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. आल्याला व्हिटॅमिन के चा चांगला स्रोत म्हटले जाते. दैनंदिन आहारात आल्याचा वापर केल्याने सतत वाटणारा मळमळीचा त्रास दूर होऊ शकतो. कोलेस्ट्राॅल असणाऱ्यांनी आले खाणे फायदेशीर ठरते.             जेवण करण्याआधी ऐक आल्याचा तुकडा मिठ आणि मिरे पूड लावून खाल्यास भूक चांगली लागते. तसेच अन्नाचे पचन होते          आल्याचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कफ व वायूचे रोग होत नाही.         आलेपाक करून रोज पाण्यात घालून सेवन केल्यास अपचन, उदररोग, पोटफुगने, पोटदुखी, मळमळ, वांती,पोटात गुरगुरणे या विकरावर उपयोग होतो         खोकला किंवा स्वास रोग असल्यास आल्याचा रस एक चमचा, लिबू रस ऐक चमचा आणि मिठ एकत्र करून घेतल्यास फायदा होतो.       अजीर्ण झाल्यास...